कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर   

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या २७०० वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आहेत, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले. केरळमध्ये सर्वाधिक १,१४७ कोरोना रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ, महाराष्ट्रात ४२४, दिल्लीत २९४ आणि गुजरातमध्ये २२३ कोरोना रुग्ण आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी १४८ कोरोना रुग्ण असून पश्चिम बंगालमध्ये ११६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित सात रुग्णांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील दोन तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
 
दिल्लीत कोरोनाचा पहिला बळी
 
राजधानी दिल्लीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाचे निदान झालेल्या एका ६० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. महिलेने पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली होती. चाचणीत कोरोना झाल्याचे निदान झाले. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही. दिल्ली सरकार सतर्क असून रुग्णालये तातडीने उपचार करण्यास सज्ज आहेत. दरम्यान, दिल्लीत काल ५६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे दिल्लीतील रुग्णसंख्या २९४ वर पोहोचली. 

Related Articles